ध्येय
~~~~~~~~
काळ आला
वेळ गेली
परत फिरा
सावल्यानो
विरह फुलांचा
ह्रदयास
पीळ घाली
ऋण घ्यावे
ऋण द्यावे
विसरू नका
भावनानो
कधीच उपकार
जरी नाती
जून झाली
शब्द दिले
शब्द घेतले
आठवू नका
वेदनानो
त्याच जखमा
जरी खपली
निघाली
वारे सुटले
रान पेटले
पळवू नका
वादळानो
असंख्य गुपिते
धरत्रीच्या
गर्भातली
प्रकाश आला
अंधार गेला
भिवू नका
दिव्यानो
जपा वात
बघा आताच
रात्र झाली
उणीव उरली
जाणीव झाली
थकू नका
पावलानो
ध्येय गाठा
जरी दिशा
बदलली
~~~~~~~~~
मनिषा बांगर -बेळगे
दुबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा