कैद करते , धुंदी त्या क्षणातली
कविता भिरभिरते कधी रानावनातून
खोपा करते , उरते माय पिलातली
कविता बागडते ,कधी पानाफुलातून
मध चाखते , भासे राणी फुलातली
कविता स्फुरते ,कधी धरीत्रीच्या कणाकणातून
आभाळ भेदते ,जणू बिजली पावसातली
कविता वाहते , उंच उंच डोंगरातून
वेगे कोसळते ,रुणझुण धबधब्यातली
कविता जगते , कधी रोमारोमातून
विरहते,जणू आठवण मर्मबंधातली
कविता मुरते , कधी सर्वांगातून
रचते , गीते ओठातली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा