दुबईच्या मनीषा बेळगे दर रविवारी एक अनोखा अनुभव आणि एक अनोखी डिश ह्यांचे मनभावन मिश्रण सादर करतात. असे म्हणतात ....छान गप्पांबरोबर जेवले तर अन्न अंगी लागते....तुम्ही हा अनुभव आणि डिश...दोन्ही एन्जोय करा....
प्रिय आई,
साष्टांग नमस्कार, पत्र मिळाल्याचा तुझा निरोप मिळाला. कालच सुनीताशी (माझी कॉलेजची मैत्रीण ) फोनवर बोलताना समजले कि आमच्या होमसायन्स विभागाच्या हेड सावंत मेडम तिला भेटल्या होत्या. त्या माझ्या आवडत्या मेडम असल्यामुळे मला त्याच्या सोबत घालवलेली ३ वर्षे डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखी तरळून गेली. सावंत मेडम आठवल्या कि N.S.S कॅम्प आठवलाच म्हणून समज. म्हणून मी यावेळी पत्रात तुला आमच्या कॅम्प् विषयीच्या आठवणींची पुन्हा आठवण करून देणार आहे. कॅम्प मध्ये खाल्लेल्या सुग्रास भोजनाची आज पुन्हा आठवण काढणार आहे.
तुला आठवत असेल तुझी इच्छा नसतानाही मी N.S.Sकॅम्प ला गेले होते. तू नकार एवढ्यासाठीच दिला होता कि माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी तुला ठाऊक होत्या. आजी नेहमी म्हण्याची हिचं कसं होणार माहित नाही तू लाडावून ठेवलं आहेस. "खाईन तर तुपाशी नाहीतर लगेच उपाशी" तर आजीला सांग मी आजही बदलले नाही. "थोडे खाते पण चविष्ट खाते " आजही तशीच आहे म्हणून.
असो तर मी N.S.S कॅम्प् विषयी बोलत होते. सगळ्यात अविस्मर्णीय कालावधी म्हणजे आमचा N.S .S कॅम्पचे कसाबखेडा या गावी घालवलेले १० दिवस.त्यावेळी सावंत मेडम आमच्यासोबत होत्या. त्या कमालीच्या काळजीवाहू ,तेवढ्याच शिस्तप्रिय होत्या. आमचा हा कॅम्प औरंगाबाद येथील महिला महाविद्यालयात तर्फे गेला होता. जवळपास ५० विध्यार्थीनी आणि २ प्राध्यापिका ,२ प्यून आणि विशेष म्हणजे आमच्या भोजनाची व्यवस्था पाहणारे स्पेशल आचारी आणि त्याची मदतनीस मंडळी असा लवाजामा कसाबखेडा (वेरूळ पासून ४ कि ,मी अंतर ) या गावी गेलो होतो.
कसाबखेडा येथे एक धर्मशाळेत आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ती धर्मशाळा कुण्या मारवाड्याने बांधली होती.असे ऐकण्यात आले. प्रवेश केल्यावर एक मोठा हॉल त्याच्या बाजूला जेवणासाठी हॉल,वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी व्यवस्था होती. पाठीमागे मोठा आवार त्यात मोठे स्वयंपाकघर तशी धर्मशाळा अगदीच प्रशस्त होती. धर्मशाळा आणि लॉज यातील फरक मला तेंव्हा कळला होता. धर्मशाळा म्हणजे माझी एक वेगळीच संकल्पना होती. नंतर कधीतरी सांगेन. तिथे एक अगदीच विशेष गोष्ट म्हणजे " सामुहिक स्नानगृह ". काही मुली तर नाहीच म्हणत होत्या मग मेडम नि त्यानुसार आमचे गट बनवले. आम्हा सर्व मुलींची एकमेकीना लाजून आणि हसून पुरेवाट झाली होती, काय करणार नाईलाज होता. स्वच्छता गृहे मात्र वेगवेगळीच होती,ते बघून जीव भांड्यात पडला होता.
आणखी एक न विसरता येणारा असा विलक्षण अनुभव, म्हणजे आम्ही ५० मुलीनी मिळून त्या गावातील मध्वर्ती भागात मोठे मोठे खड्डे असलेला रस्ता माती आणि मुरूमचा भराव टाकून चांगला बनवला होता. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आजही मी विसरू शकत नाही. त्या रस्त्यावरील खड्यांमुळे तो रस्ता रह्दारीकारिता बंद करण्यात आला होता. गावातील एका व्यक्तीने त्यांच्या ट्रकटरने गावाबाहेरून खूप सारा मुरूम आणि माती आणून दिली होती. अगदी सकाळपासून, संध्याकाळपर्यंत आम्ही रस्ता तयार केला होता. १० दिवस भरगच्च प्रोग्रामस केले होते.everything was planned by sawant madam.
त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हेल्थ शिबीर, रक्तदान शिबीर, पथनाट्य, गावाची साफ सफाई, गावकऱ्यानं सोबत गप्पा, संध्याकाळी साक्षरतेचे वर्ग हि घेतले. १० दिवसात खूप काही केले. एकंदरीत गावातील व्यक्तींकडून "अडी अडचणीवर मात करून जीवन कसे जगावे "हेच जास्त शिकायला मिळाले. प्रचंड गैरसोयीमध्ये हि गावकरी सुखीच होते. विशेष म्हणजे आमच्याबरोबर आलेला आचारी एवढे स्वादिष्ट भोजन बनवायचा कि तुझ्या हातच्या जेवणाची पण आठवण नाही आली. रागवू नकोस तुला माहिती आहे. तूच म्हणतेस ना कशाचे कौतुक करताना कंजुषी करू नये.
आम्ही पहाटे पाच वाजता उठत असू,सकाळचा चहा घेऊन गावातून एक प्रभात फेरी मारून साधारण तासाभराने परत धर्मशाळेत परत येत असू. मग फ्रेश होऊन नाश्ता करण्यास जेवणाच्या हॉल मध्ये जमत असू, नाश्त्यासाठी पोहे, उपमा ,वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी मिळत होत्या. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाचीही चांगलीच चंगळ होती. रोज वेगळा मेनू असायचा.म्हणतात आपण कुठेही एखाद वेळी सुग्रास जेवण जेवलो तर त्याची चव तुमच्या जिभेवर रेंगाळत असते.हे अगदी खरे आहे. आई !!!!
एकदिवस तर वनभोजनास गेलो होतोत, तेही बैलगाडीतून,आम्ही सर्वांनी आळीपाळीने बसून बैलगाडीच्या प्रवासाचा आनंद लुटला होता. बैलगाडीचा बंदोबस्त गावातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीने केला होता. त्यांच्याच शेतात आम्ही वनभोजनासाठी गेलो होतो. मनोसोक्त बोरे,चिंचा खाल्या. सावंत मेडम मध्ये मध्ये दरडावायच्या कमी खा,आजारी पडाल. सुदैवाने कुणी आजारी पडले नाही. नेमकी दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री होती. त्यादिवशी घृष्णेश्वरचे दर्शन घेतले होते. सोबत सगळा उपवासाचा फराळ होता. साबुदाणा वडा,साबुदाण्याची उसळ, शेंगदाण्याची आमटी, बटाटा भाजी, ताक वगैरे एकूण खाऊन पिवून उपवास केला. एक दिवस तर ,सावंत मेडम म्हणाल्या रात्रीचे जेवण एकदम गावाच्या स्टाईल बनवा. झुणका भाकरी टाईपचे, मग त्यादिवशी बाजरीच्या पिठाच्या भाकरी आणि पिठले (झुणका) मसाले भात, हिरव्या मिरच्याची झणझणीत चटणी (ठेचा ,खर्डा अशी वेगवेगळ्या भागातील नावे) आम्ही सर्वांनी मस्त ताव मारला, बाजरीच्या भाकरी सर्वांना आवडतात असे नाही तरीही मुलीनी न आगे देखा न पिछे सिधा भाकरीवर तुटून पडलो, तरी सावंत मेडम म्हणत होत्याच मुलीनो जपून नाहीतर रात्री पोट दुखेल.बऱ्याच जणींनी घाबरून ठेच्याकडे खाणे दूर तिकडे बघितले पण नाही. या सगळ्यात मला खास लक्षात राहिली ती एक भाजी त्यादिवशी पहिल्यांदा खाल्ली हि भाजी कोणती असावी आम्ही आपपसात बोलत होतो, शेपू ची भाजी असा निष्कर्ष निघाला पण ती थोडीशी आंबट पण लागत होती.मग थेट आचाऱ्यालाच विचारले शेपू आणि आंबट चुका.
मला आठवले आई तू बऱ्याचदा बनवायचीस पण मला आवडणार नाही म्हणून नेहमी वेगळी भाजी करायचीस. त्यामुळे या भाजीचा स्वाद मी कधी घेतला नव्हता. मी मात्र त्याकडून रेसिपी लिहूनच घेतली. तू कशी बनवतेस माहित आहे पण साहजिकच त्याची रेसिपी वेगळी होती.
मी इथे Dubai मध्ये आणखी थोडा बदल करून करत असते मुलांना हि आवडायला लागलीय, Dubai मध्ये "Baqer Mohebi Supermarket" आहे फक्त तिथेच आंबट चुक्याची भाजी मिळते मात्र मेथी पालक,शेपू सगळीकडे उपलब्ध असतात.माझ्याकडे आठवड्यातून एकदा बनतेच. मी मूळ रेसीपी मध्ये बदल करून करत असते. मी तुला रेसिपी देते तू नक्की करून बघ मिक्स भाजी साहित्यः साधारण ४ व्यक्तींना पुरेन एवढी अर्धी जुडी शेपू , अर्धी जुडी पालक, हिरवा वाटाणा अर्धी वाटी, आंबट चुका अर्धी जुडी घ्यावा, १ चमचा लसून मिरची पेस्ट 2 चमचे दाण्याचे कूट 2 चमचे बेसन, चवीप्रमाणे मीठ, २ चमचे तेल, चिमुटभर हळद व हिंग, १ चमचा लसून आणि कांदा बारीक कापून (जिवंत फोडणी करिता ) जिरं,मोहरी फोडणीसाठी
कृतीः सर्व भाज्या निवडून स्वच्छ धुवून घ्याव्यात, त्यातील फक्त शेपू आणि पालक या भाज्या बारीक कापून घ्यावयात.पालक ,शेपू आणि वाटाणा प्रथम शिजण्यास टाकावा नंतर आंबट चुका टाकावा कारण चुका लगेच शिजतो. त्यात थोडे पाणी घालून भाज्या मऊ शिजवून घ्याव्यात.पालेभाज्या जास्त शिजवू नये त्यातील जीवनसत्वे नष्ट होतात ,आणि प्रेशर कुकर मध्ये जर शिज्वल्या तर अधिक जीवनसत्वे वाचतात. हे तुला माहितच आहे . असो नंतर भाजी मोठ्या चमच्याने एकजीव करून घ्यावी. त्यात डाळीचे पीठ ,लसून मिरची पेस्ट ,चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकजीव करून घ्यावे. कढईत जिरं ,मोहरी हिंग ,हळद फोडणी करून त्यात तयार मिश्रण घालून स्लो फ्लेम वर गॅसवर शिजत ठेवावी. गरजेपुरते पाणी घालून शिजू द्यावे नंतर त्यात दाण्याचे कूट घालावे. आणि जेवणास घेण्या अगोदर जिवंत फोडणी साठी तेल गरम करून त्यात लसून आणि कांद्याचे पातळ उभे काप घालावे लालसर कुरकुरीत झाल्यावर पळीने वरून भाजीत घालावे. खूपच टेस्टी लागते. सर्व एकत्रित करून चपाती सोबत खायला देणे अथवा बाजरीची, ज्वारीची, तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी (हि सगळी पीठे दुबईमध्ये उपलब्ध आहेत).
कॅम्प च्या शेवटच्या दिवशी अंतकरण भरून येत होते ,आमच्यातील काही भगिनींनी गळ्यात पडून भावनांना वाट मोकळी करून दिली होती. माझे हि डोळे पाणावले होते. न जाणो भविष्यात या सगळ्या मैत्रिणी आणि मेडम पुन्हा असे एकत्र राहण्याचा योग येईलच असे नाही.त्यांनतर खरच तसा योग आलाच नाही. आम्हला निरोप देण्यासाठी अख्खा गाव आला होता बालगोपाळांसह बाया बापड्या, वडीलधारी मंडळीनी पुन्हा येण्याचा आग्रह करत होती. ते अगदी मंतरलेले दिवस होते विसरणे कदापि शक्य नाही.
तूर्तास थांबते पुन्हा लिहीनच.
तुझीच मनिषा
प्रिय आई,
साष्टांग नमस्कार, पत्र मिळाल्याचा तुझा निरोप मिळाला. कालच सुनीताशी (माझी कॉलेजची मैत्रीण ) फोनवर बोलताना समजले कि आमच्या होमसायन्स विभागाच्या हेड सावंत मेडम तिला भेटल्या होत्या. त्या माझ्या आवडत्या मेडम असल्यामुळे मला त्याच्या सोबत घालवलेली ३ वर्षे डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखी तरळून गेली. सावंत मेडम आठवल्या कि N.S.S कॅम्प आठवलाच म्हणून समज. म्हणून मी यावेळी पत्रात तुला आमच्या कॅम्प् विषयीच्या आठवणींची पुन्हा आठवण करून देणार आहे. कॅम्प मध्ये खाल्लेल्या सुग्रास भोजनाची आज पुन्हा आठवण काढणार आहे.
तुला आठवत असेल तुझी इच्छा नसतानाही मी N.S.Sकॅम्प ला गेले होते. तू नकार एवढ्यासाठीच दिला होता कि माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी तुला ठाऊक होत्या. आजी नेहमी म्हण्याची हिचं कसं होणार माहित नाही तू लाडावून ठेवलं आहेस. "खाईन तर तुपाशी नाहीतर लगेच उपाशी" तर आजीला सांग मी आजही बदलले नाही. "थोडे खाते पण चविष्ट खाते " आजही तशीच आहे म्हणून.
असो तर मी N.S.S कॅम्प् विषयी बोलत होते. सगळ्यात अविस्मर्णीय कालावधी म्हणजे आमचा N.S .S कॅम्पचे कसाबखेडा या गावी घालवलेले १० दिवस.त्यावेळी सावंत मेडम आमच्यासोबत होत्या. त्या कमालीच्या काळजीवाहू ,तेवढ्याच शिस्तप्रिय होत्या. आमचा हा कॅम्प औरंगाबाद येथील महिला महाविद्यालयात तर्फे गेला होता. जवळपास ५० विध्यार्थीनी आणि २ प्राध्यापिका ,२ प्यून आणि विशेष म्हणजे आमच्या भोजनाची व्यवस्था पाहणारे स्पेशल आचारी आणि त्याची मदतनीस मंडळी असा लवाजामा कसाबखेडा (वेरूळ पासून ४ कि ,मी अंतर ) या गावी गेलो होतो.
कसाबखेडा येथे एक धर्मशाळेत आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ती धर्मशाळा कुण्या मारवाड्याने बांधली होती.असे ऐकण्यात आले. प्रवेश केल्यावर एक मोठा हॉल त्याच्या बाजूला जेवणासाठी हॉल,वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी व्यवस्था होती. पाठीमागे मोठा आवार त्यात मोठे स्वयंपाकघर तशी धर्मशाळा अगदीच प्रशस्त होती. धर्मशाळा आणि लॉज यातील फरक मला तेंव्हा कळला होता. धर्मशाळा म्हणजे माझी एक वेगळीच संकल्पना होती. नंतर कधीतरी सांगेन. तिथे एक अगदीच विशेष गोष्ट म्हणजे " सामुहिक स्नानगृह ". काही मुली तर नाहीच म्हणत होत्या मग मेडम नि त्यानुसार आमचे गट बनवले. आम्हा सर्व मुलींची एकमेकीना लाजून आणि हसून पुरेवाट झाली होती, काय करणार नाईलाज होता. स्वच्छता गृहे मात्र वेगवेगळीच होती,ते बघून जीव भांड्यात पडला होता.
आणखी एक न विसरता येणारा असा विलक्षण अनुभव, म्हणजे आम्ही ५० मुलीनी मिळून त्या गावातील मध्वर्ती भागात मोठे मोठे खड्डे असलेला रस्ता माती आणि मुरूमचा भराव टाकून चांगला बनवला होता. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आजही मी विसरू शकत नाही. त्या रस्त्यावरील खड्यांमुळे तो रस्ता रह्दारीकारिता बंद करण्यात आला होता. गावातील एका व्यक्तीने त्यांच्या ट्रकटरने गावाबाहेरून खूप सारा मुरूम आणि माती आणून दिली होती. अगदी सकाळपासून, संध्याकाळपर्यंत आम्ही रस्ता तयार केला होता. १० दिवस भरगच्च प्रोग्रामस केले होते.everything was planned by sawant madam.
त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हेल्थ शिबीर, रक्तदान शिबीर, पथनाट्य, गावाची साफ सफाई, गावकऱ्यानं सोबत गप्पा, संध्याकाळी साक्षरतेचे वर्ग हि घेतले. १० दिवसात खूप काही केले. एकंदरीत गावातील व्यक्तींकडून "अडी अडचणीवर मात करून जीवन कसे जगावे "हेच जास्त शिकायला मिळाले. प्रचंड गैरसोयीमध्ये हि गावकरी सुखीच होते. विशेष म्हणजे आमच्याबरोबर आलेला आचारी एवढे स्वादिष्ट भोजन बनवायचा कि तुझ्या हातच्या जेवणाची पण आठवण नाही आली. रागवू नकोस तुला माहिती आहे. तूच म्हणतेस ना कशाचे कौतुक करताना कंजुषी करू नये.
आम्ही पहाटे पाच वाजता उठत असू,सकाळचा चहा घेऊन गावातून एक प्रभात फेरी मारून साधारण तासाभराने परत धर्मशाळेत परत येत असू. मग फ्रेश होऊन नाश्ता करण्यास जेवणाच्या हॉल मध्ये जमत असू, नाश्त्यासाठी पोहे, उपमा ,वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी मिळत होत्या. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाचीही चांगलीच चंगळ होती. रोज वेगळा मेनू असायचा.म्हणतात आपण कुठेही एखाद वेळी सुग्रास जेवण जेवलो तर त्याची चव तुमच्या जिभेवर रेंगाळत असते.हे अगदी खरे आहे. आई !!!!
एकदिवस तर वनभोजनास गेलो होतोत, तेही बैलगाडीतून,आम्ही सर्वांनी आळीपाळीने बसून बैलगाडीच्या प्रवासाचा आनंद लुटला होता. बैलगाडीचा बंदोबस्त गावातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीने केला होता. त्यांच्याच शेतात आम्ही वनभोजनासाठी गेलो होतो. मनोसोक्त बोरे,चिंचा खाल्या. सावंत मेडम मध्ये मध्ये दरडावायच्या कमी खा,आजारी पडाल. सुदैवाने कुणी आजारी पडले नाही. नेमकी दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री होती. त्यादिवशी घृष्णेश्वरचे दर्शन घेतले होते. सोबत सगळा उपवासाचा फराळ होता. साबुदाणा वडा,साबुदाण्याची उसळ, शेंगदाण्याची आमटी, बटाटा भाजी, ताक वगैरे एकूण खाऊन पिवून उपवास केला. एक दिवस तर ,सावंत मेडम म्हणाल्या रात्रीचे जेवण एकदम गावाच्या स्टाईल बनवा. झुणका भाकरी टाईपचे, मग त्यादिवशी बाजरीच्या पिठाच्या भाकरी आणि पिठले (झुणका) मसाले भात, हिरव्या मिरच्याची झणझणीत चटणी (ठेचा ,खर्डा अशी वेगवेगळ्या भागातील नावे) आम्ही सर्वांनी मस्त ताव मारला, बाजरीच्या भाकरी सर्वांना आवडतात असे नाही तरीही मुलीनी न आगे देखा न पिछे सिधा भाकरीवर तुटून पडलो, तरी सावंत मेडम म्हणत होत्याच मुलीनो जपून नाहीतर रात्री पोट दुखेल.बऱ्याच जणींनी घाबरून ठेच्याकडे खाणे दूर तिकडे बघितले पण नाही. या सगळ्यात मला खास लक्षात राहिली ती एक भाजी त्यादिवशी पहिल्यांदा खाल्ली हि भाजी कोणती असावी आम्ही आपपसात बोलत होतो, शेपू ची भाजी असा निष्कर्ष निघाला पण ती थोडीशी आंबट पण लागत होती.मग थेट आचाऱ्यालाच विचारले शेपू आणि आंबट चुका.
मला आठवले आई तू बऱ्याचदा बनवायचीस पण मला आवडणार नाही म्हणून नेहमी वेगळी भाजी करायचीस. त्यामुळे या भाजीचा स्वाद मी कधी घेतला नव्हता. मी मात्र त्याकडून रेसिपी लिहूनच घेतली. तू कशी बनवतेस माहित आहे पण साहजिकच त्याची रेसिपी वेगळी होती.
मी इथे Dubai मध्ये आणखी थोडा बदल करून करत असते मुलांना हि आवडायला लागलीय, Dubai मध्ये "Baqer Mohebi Supermarket" आहे फक्त तिथेच आंबट चुक्याची भाजी मिळते मात्र मेथी पालक,शेपू सगळीकडे उपलब्ध असतात.माझ्याकडे आठवड्यातून एकदा बनतेच. मी मूळ रेसीपी मध्ये बदल करून करत असते. मी तुला रेसिपी देते तू नक्की करून बघ मिक्स भाजी साहित्यः साधारण ४ व्यक्तींना पुरेन एवढी अर्धी जुडी शेपू , अर्धी जुडी पालक, हिरवा वाटाणा अर्धी वाटी, आंबट चुका अर्धी जुडी घ्यावा, १ चमचा लसून मिरची पेस्ट 2 चमचे दाण्याचे कूट 2 चमचे बेसन, चवीप्रमाणे मीठ, २ चमचे तेल, चिमुटभर हळद व हिंग, १ चमचा लसून आणि कांदा बारीक कापून (जिवंत फोडणी करिता ) जिरं,मोहरी फोडणीसाठी
कृतीः सर्व भाज्या निवडून स्वच्छ धुवून घ्याव्यात, त्यातील फक्त शेपू आणि पालक या भाज्या बारीक कापून घ्यावयात.पालक ,शेपू आणि वाटाणा प्रथम शिजण्यास टाकावा नंतर आंबट चुका टाकावा कारण चुका लगेच शिजतो. त्यात थोडे पाणी घालून भाज्या मऊ शिजवून घ्याव्यात.पालेभाज्या जास्त शिजवू नये त्यातील जीवनसत्वे नष्ट होतात ,आणि प्रेशर कुकर मध्ये जर शिज्वल्या तर अधिक जीवनसत्वे वाचतात. हे तुला माहितच आहे . असो नंतर भाजी मोठ्या चमच्याने एकजीव करून घ्यावी. त्यात डाळीचे पीठ ,लसून मिरची पेस्ट ,चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकजीव करून घ्यावे. कढईत जिरं ,मोहरी हिंग ,हळद फोडणी करून त्यात तयार मिश्रण घालून स्लो फ्लेम वर गॅसवर शिजत ठेवावी. गरजेपुरते पाणी घालून शिजू द्यावे नंतर त्यात दाण्याचे कूट घालावे. आणि जेवणास घेण्या अगोदर जिवंत फोडणी साठी तेल गरम करून त्यात लसून आणि कांद्याचे पातळ उभे काप घालावे लालसर कुरकुरीत झाल्यावर पळीने वरून भाजीत घालावे. खूपच टेस्टी लागते. सर्व एकत्रित करून चपाती सोबत खायला देणे अथवा बाजरीची, ज्वारीची, तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी (हि सगळी पीठे दुबईमध्ये उपलब्ध आहेत).
कॅम्प च्या शेवटच्या दिवशी अंतकरण भरून येत होते ,आमच्यातील काही भगिनींनी गळ्यात पडून भावनांना वाट मोकळी करून दिली होती. माझे हि डोळे पाणावले होते. न जाणो भविष्यात या सगळ्या मैत्रिणी आणि मेडम पुन्हा असे एकत्र राहण्याचा योग येईलच असे नाही.त्यांनतर खरच तसा योग आलाच नाही. आम्हला निरोप देण्यासाठी अख्खा गाव आला होता बालगोपाळांसह बाया बापड्या, वडीलधारी मंडळीनी पुन्हा येण्याचा आग्रह करत होती. ते अगदी मंतरलेले दिवस होते विसरणे कदापि शक्य नाही.
तूर्तास थांबते पुन्हा लिहीनच.
तुझीच मनिषा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा