मनीषा बेळगे आज एक मस्त डिश घेऊन आल्या आहेत "खाईन तुपाशी" मध्ये...त्यांचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे...त्या फक्त रेसिपी देत नाहीत...एका संस्कृतीशी ओळख करून देतात....एका जगाशी ओळख करून देतात...तुम्हाला पटते ना माझे म्हणणे ?....
प्रिय आई,
मी साष्टांगभावे पुढचे मनोगत लिहित आहे, वाचून घ्यावे.
मला नेहमी वाटते भारतीय संस्कृती हि खादाड संस्कृती म्हणून गणली जात असावी. आपल्या देशात जेवढे खाल्ले जाते आणि जेवढे खाऊ घातले जाते, जगाच्या पाठीवर कुठेच नसेल. (उपाशी पोटी तितकेच लोक असतात तो भाग वेगळा )
पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने करून बघण्याची हौस सर्वात आधी कोणत्या आदिमानवाला झाली असावी?तसा संशोधनाचा विषय आहे.प्रत्येक पदार्थ अपघाताने तयार झाला असावा कि मुद्दाम बनवला असावा.
असो मी फार खोलात जात नाही.कारण तसे धागेदोरे मिळण्याची सुतराम शक्यता वाटत नाही.
" खाण्यासाठी जन्म आपुला " काही लोक तर या म्हणी मध्ये अगदी फीट बसतात. अशीच माझी एक मैत्रीण आहे भयंकर खादाड मांसाहारी पदार्थांची शौकीन,एकदा एका चीनी हॉटेल मध्ये स्पेशल साप मिळतो, अशी माहिती मिळाल्यावर बयेने लगेच भेट दिली. मला वर्णन करून सांगू लागली. तिला म्हंटले तू आधी वर्णन बंद कर,नाहीतर मला २ दिवस जेवण जाणार नाही. असे वर्णन कि जशी आफ्रिकेतील जंगलातून तिला मेजवानी आलीय.तिला म्हंटले किती खाशील,तुझ्या खाण्याला काही मर्यादा, खाऊन खाऊन मरशील. यावर बयेचे उत्तर " अगं न खाता मरण्यापेक्षा, भरपेट मनोसोक्त खाऊन मेलेले बरे.असो ,खाऊ दे. मला काय त्याचे तसेही तू म्हणतेस न "अन्न हे पूर्ण ब्रम्ह" असते कोणाच्या खवय्येगिरीला आणि खाद्य् पदार्थांना नावे ठेवू नये. म्हणजे खेकडा, साप,मुंग्या,बेडूक,पालं, घोरपड यांच्या पदार्थांना हि अन्न हे पूर्ण ब्रम्ह म्हणावे कि काय? सध्या या घोर विवंचनेत आहे. असो
तसेही जगात सर्वच प्राणी मांसाहारी नसतात. काही अजूनही शाकाहारी आहेत. एका सर्वेक्षणाच्या आधारे,पाश्चात्य देशात शाकाहारी जेवणाचे महत्व पटू लागलेय. अनेक लोकांनी मांसाहार सोडून शाकाहार अंगिकारला आहे.
तसेही जगात प्रत्येक देशाच्या अन्न रांधण्यापासून खाण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत. आपल्या कडे हाताने खातात, पाश्चात्य देशात सुरी, काटे, चमचे आणि चीन, जपान मध्ये चॉप स्टिक( म्हणजे २ काड्या )ने खातात. प्रत्येक ठिकाणचे आपले स्वतःचे असे वैशिष्ठ्य पूर्ण खाद्य आहे.जगात प्रथम पसंतीचे भोजन सर्वेक्षणानुसार प्रथम १० देशात भारताचा समावेश आहे. ग्रेट न. भारतीय जेवण तिखट आणि तेलकट असते. असा बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो.
सध्या दुबई मध्ये मी ज्या भागात राहते, त्याला अल करामा म्हणतात याला आणखी एक टोपण नाव आहे ते म्हणजे "मिनी इंडिया" ...अगदी या नावाला साजेशा भाग आहे.जास्तीत जास्त भारतीय हॉटेल्स आहेत.अरेबिक भाषेतील दुकानच्या पाट्या आणि दर अर्ध्या तासाने गस्त घालणारी पोलीसची गाडी सोडली तर सगळे भारतीय वातावरण आहे.त्यामुळे आपण भारतातच आहोत असेच वाटते.
आज मी तुला अरेबिक डिश हमुस बद्दल सांगणार आहे.हमुस शिवाय आखाती देशातील जेवणाला पूर्णत्व येत नाही.हि रेसिपी अत्यंत सोपी आहे.आणि चविष्ट देखील
हमुस
साहित्य -१ वाटी काबुली चणे (रात्रभर भिजवलेले ),५ लसून पाकळ्या,२ चमचे लिंबाचा रस, ४ चमचे ओलिव्ह ओईल,१ चमचा तहीना पेस्ट किंवा १ चमचा भाजलेले तीळ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ,१ कप पाणी
कृती - सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी.त्यात वरून ओलिव्ह ओईल घालावे तयार झाले हमुस, कुठल्याही टोस्ट केलेल्या ब्रेड सोबत छान लागते. वरती चिमुटभर लाल मिरची पावडर आणि पार्स्ले ने सजावट करावी. पार्स्ले नसेल तर कोथंबीर हि चालेल.
हा पदार्थ वांग्याचे तळलेले काप,भजी काकडी, गाजर यांचे काप यासोबत देखील खालला जातो.
अगदी सोपा आहे. हा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून २ दिवस टिकतो.
नक्की बनवशील. तुला आवडला कि नाही कळव.
तूर्तास थांबते
तुझी लाडकी लेक
मनिषा
प्रिय आई,
मी साष्टांगभावे पुढचे मनोगत लिहित आहे, वाचून घ्यावे.
मला नेहमी वाटते भारतीय संस्कृती हि खादाड संस्कृती म्हणून गणली जात असावी. आपल्या देशात जेवढे खाल्ले जाते आणि जेवढे खाऊ घातले जाते, जगाच्या पाठीवर कुठेच नसेल. (उपाशी पोटी तितकेच लोक असतात तो भाग वेगळा )
पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने करून बघण्याची हौस सर्वात आधी कोणत्या आदिमानवाला झाली असावी?तसा संशोधनाचा विषय आहे.प्रत्येक पदार्थ अपघाताने तयार झाला असावा कि मुद्दाम बनवला असावा.
असो मी फार खोलात जात नाही.कारण तसे धागेदोरे मिळण्याची सुतराम शक्यता वाटत नाही.
" खाण्यासाठी जन्म आपुला " काही लोक तर या म्हणी मध्ये अगदी फीट बसतात. अशीच माझी एक मैत्रीण आहे भयंकर खादाड मांसाहारी पदार्थांची शौकीन,एकदा एका चीनी हॉटेल मध्ये स्पेशल साप मिळतो, अशी माहिती मिळाल्यावर बयेने लगेच भेट दिली. मला वर्णन करून सांगू लागली. तिला म्हंटले तू आधी वर्णन बंद कर,नाहीतर मला २ दिवस जेवण जाणार नाही. असे वर्णन कि जशी आफ्रिकेतील जंगलातून तिला मेजवानी आलीय.तिला म्हंटले किती खाशील,तुझ्या खाण्याला काही मर्यादा, खाऊन खाऊन मरशील. यावर बयेचे उत्तर " अगं न खाता मरण्यापेक्षा, भरपेट मनोसोक्त खाऊन मेलेले बरे.असो ,खाऊ दे. मला काय त्याचे तसेही तू म्हणतेस न "अन्न हे पूर्ण ब्रम्ह" असते कोणाच्या खवय्येगिरीला आणि खाद्य् पदार्थांना नावे ठेवू नये. म्हणजे खेकडा, साप,मुंग्या,बेडूक,पालं, घोरपड यांच्या पदार्थांना हि अन्न हे पूर्ण ब्रम्ह म्हणावे कि काय? सध्या या घोर विवंचनेत आहे. असो
तसेही जगात सर्वच प्राणी मांसाहारी नसतात. काही अजूनही शाकाहारी आहेत. एका सर्वेक्षणाच्या आधारे,पाश्चात्य देशात शाकाहारी जेवणाचे महत्व पटू लागलेय. अनेक लोकांनी मांसाहार सोडून शाकाहार अंगिकारला आहे.
तसेही जगात प्रत्येक देशाच्या अन्न रांधण्यापासून खाण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत. आपल्या कडे हाताने खातात, पाश्चात्य देशात सुरी, काटे, चमचे आणि चीन, जपान मध्ये चॉप स्टिक( म्हणजे २ काड्या )ने खातात. प्रत्येक ठिकाणचे आपले स्वतःचे असे वैशिष्ठ्य पूर्ण खाद्य आहे.जगात प्रथम पसंतीचे भोजन सर्वेक्षणानुसार प्रथम १० देशात भारताचा समावेश आहे. ग्रेट न. भारतीय जेवण तिखट आणि तेलकट असते. असा बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो.
सध्या दुबई मध्ये मी ज्या भागात राहते, त्याला अल करामा म्हणतात याला आणखी एक टोपण नाव आहे ते म्हणजे "मिनी इंडिया" ...अगदी या नावाला साजेशा भाग आहे.जास्तीत जास्त भारतीय हॉटेल्स आहेत.अरेबिक भाषेतील दुकानच्या पाट्या आणि दर अर्ध्या तासाने गस्त घालणारी पोलीसची गाडी सोडली तर सगळे भारतीय वातावरण आहे.त्यामुळे आपण भारतातच आहोत असेच वाटते.
आज मी तुला अरेबिक डिश हमुस बद्दल सांगणार आहे.हमुस शिवाय आखाती देशातील जेवणाला पूर्णत्व येत नाही.हि रेसिपी अत्यंत सोपी आहे.आणि चविष्ट देखील
हमुस
साहित्य -१ वाटी काबुली चणे (रात्रभर भिजवलेले ),५ लसून पाकळ्या,२ चमचे लिंबाचा रस, ४ चमचे ओलिव्ह ओईल,१ चमचा तहीना पेस्ट किंवा १ चमचा भाजलेले तीळ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ,१ कप पाणी
कृती - सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी.त्यात वरून ओलिव्ह ओईल घालावे तयार झाले हमुस, कुठल्याही टोस्ट केलेल्या ब्रेड सोबत छान लागते. वरती चिमुटभर लाल मिरची पावडर आणि पार्स्ले ने सजावट करावी. पार्स्ले नसेल तर कोथंबीर हि चालेल.
हा पदार्थ वांग्याचे तळलेले काप,भजी काकडी, गाजर यांचे काप यासोबत देखील खालला जातो.
अगदी सोपा आहे. हा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून २ दिवस टिकतो.
नक्की बनवशील. तुला आवडला कि नाही कळव.
तूर्तास थांबते
तुझी लाडकी लेक
मनिषा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा