मनीषा बेळगे "खाईन तुपाशी" मध्ये एक वेगळीच रेसिपी घेऊन आल्या आहेत....
प्रिय आई साष्टांग प्रणाम,
आज च्या पत्रात मी थोडे अवांतर लिहितेय. नेहमीच्या पाककृती ऐवजी आज नात्याची रेसिपी लिहिलीय. तुला आवडेलच अशी माफक अपेक्षा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ "नात्यातले ओयासिस " (ओयासिस = वाळवंटातील नैसर्गिक पाणवठा )
तशी नाती खूप असतात,पण काही नुसतीच माती असतात. रक्ताची नाती, कृत्रिम नाती, मानलेली नाती, जबरदस्तीने लादलेली नाती या नात्याच्या वाळवंटात एखादे " नात्यातले ओयासिस " असावे. अखंड ओलावा असणारे, गोड आणि माधुर्य असणारे, कधीही न आटणारे ओयासिस असावे.
गरजेतून एखादे नवे नाते जन्मास येते. कधी तात्पुरते,कधी एकटेपणामुळे मुळात स्वार्थातून अस्तित्वात येते. नंतर अशा नात्याचा सहवास हवासा वाटतो, नात्यातला हळुवार पण जपावा वाटतो तेच नाते आपले " नात्यातले ओयासिस" होऊन जाते. तशी नात्याची कमी नसतेच, अगदीच कमी असतात ती "जवळची नाती " आता काही जवळची नाती फार जपून ठेवलेली अत्तराची कुपीप्रमाणे असतात, त्यातले अत्तर संपले तरी ती का जपतो हे मात्र मोठे कोडे आहे, कधीही न सोडवता यावे इतके अटळ…
"आपण ज्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागतो, ती नाती जवळची कि, जी नाती आपल्या मनाप्रमाणे वागतात ती जवळची ? हा उहापोह इथेच संपत नाही. एकमेकांच्या मनाप्रमाणे वागणे परिस्थितीनुसार बदलत जाते आणि मुखवट्यांच्या आत लपलेले चेहरे आपल्या समोर येतात, कधी उगाच भूतकाळ स्मरून ते नाते जपले जाते. मुळात अशा नात्यांपासून आपण दूर पळण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो इतकचं…
काही नाती हेतुपुरस्सर असतात, काही समाज व्यवस्थेने लादलेली असतात. त्या त्या नात्याची मुळे इतकी रुजलेली असतात कि ती नकळत गृहीत धरली जातात.
बहुतेक वेळा हा द्वेष एकतर्फी असतो …. दुसऱ्या बाजूला पळवाट शोधण्याची गरजही पडत नाही. एक दुरावला कि दुसरा आपोआप दुरावतो, त्यावेळी मन आणि बुद्धीत द्वंद्वयुद्ध जडते. मनाला जे हवे असते,ते बुद्धीला पटत नाही. आणि बुद्धीला योग्य वाटते ते मन मानत नाही. तरी चंचल मन पुन्हा पंख फैलावून उड्डाण करते नवीन ओयासिस दिशेने …
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~ आई जे सुचले ते कागदावर मांडले यातले किती चांगले आणि किती वाईट हे निवडायचे काम तुझे … तांदळातले खडे निवडते न अगदी तसे काम आहे.
*तूर्तास थांबते * पुन्हा लिहीनच
तुझी लाडकी लेक
मनिषा
प्रिय आई साष्टांग प्रणाम,
आज च्या पत्रात मी थोडे अवांतर लिहितेय. नेहमीच्या पाककृती ऐवजी आज नात्याची रेसिपी लिहिलीय. तुला आवडेलच अशी माफक अपेक्षा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ "नात्यातले ओयासिस " (ओयासिस = वाळवंटातील नैसर्गिक पाणवठा )
तशी नाती खूप असतात,पण काही नुसतीच माती असतात. रक्ताची नाती, कृत्रिम नाती, मानलेली नाती, जबरदस्तीने लादलेली नाती या नात्याच्या वाळवंटात एखादे " नात्यातले ओयासिस " असावे. अखंड ओलावा असणारे, गोड आणि माधुर्य असणारे, कधीही न आटणारे ओयासिस असावे.
गरजेतून एखादे नवे नाते जन्मास येते. कधी तात्पुरते,कधी एकटेपणामुळे मुळात स्वार्थातून अस्तित्वात येते. नंतर अशा नात्याचा सहवास हवासा वाटतो, नात्यातला हळुवार पण जपावा वाटतो तेच नाते आपले " नात्यातले ओयासिस" होऊन जाते. तशी नात्याची कमी नसतेच, अगदीच कमी असतात ती "जवळची नाती " आता काही जवळची नाती फार जपून ठेवलेली अत्तराची कुपीप्रमाणे असतात, त्यातले अत्तर संपले तरी ती का जपतो हे मात्र मोठे कोडे आहे, कधीही न सोडवता यावे इतके अटळ…
"आपण ज्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागतो, ती नाती जवळची कि, जी नाती आपल्या मनाप्रमाणे वागतात ती जवळची ? हा उहापोह इथेच संपत नाही. एकमेकांच्या मनाप्रमाणे वागणे परिस्थितीनुसार बदलत जाते आणि मुखवट्यांच्या आत लपलेले चेहरे आपल्या समोर येतात, कधी उगाच भूतकाळ स्मरून ते नाते जपले जाते. मुळात अशा नात्यांपासून आपण दूर पळण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो इतकचं…
काही नाती हेतुपुरस्सर असतात, काही समाज व्यवस्थेने लादलेली असतात. त्या त्या नात्याची मुळे इतकी रुजलेली असतात कि ती नकळत गृहीत धरली जातात.
बहुतेक वेळा हा द्वेष एकतर्फी असतो …. दुसऱ्या बाजूला पळवाट शोधण्याची गरजही पडत नाही. एक दुरावला कि दुसरा आपोआप दुरावतो, त्यावेळी मन आणि बुद्धीत द्वंद्वयुद्ध जडते. मनाला जे हवे असते,ते बुद्धीला पटत नाही. आणि बुद्धीला योग्य वाटते ते मन मानत नाही. तरी चंचल मन पुन्हा पंख फैलावून उड्डाण करते नवीन ओयासिस दिशेने …
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~~ आई जे सुचले ते कागदावर मांडले यातले किती चांगले आणि किती वाईट हे निवडायचे काम तुझे … तांदळातले खडे निवडते न अगदी तसे काम आहे.
*तूर्तास थांबते * पुन्हा लिहीनच
तुझी लाडकी लेक
मनिषा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा